Skip to main content

तुरीच्या दाण्याची भाजी / आमटी Recipe in Marathi

हिवाळ्यामध्ये तुरीचे कोवळे दाणेही बाजारात यायला लागतात. मिसळीच्या भाजीत तर हे घालतोच आपण पण या दाण्यांची आमटी फार खमंग लागते. त्यामुळे बाजारात हे दाणे दिसले की माझ्या तोंडाला पाणी सुटतं. या मोसमातले पहिले तुरीचे दाणे मला परवाच मंडईत मिळाले. म्हणून लगेचच त्यांची आमटी केली. आजची रेसिपी आहे तुरीच्या दाण्यांची भाजी किंवा तुम्ही त्याला आमटी असे सुद्धा म्हणू शकता.
साहित्य – १ वाटी सोललेले तुरीचे दाणे, १ मोठा कांदा लांब पातळ चिरलेला, २ टीस्पून ओलं खोबरं, १ हिरवी मिरची, २ लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून लाल तिखट, २ टीस्पून काळा मसाला, मीठ चवीनुसार, २ टीस्पून दाण्याचं कूट (ऐच्छिक), १ टेबलस्पून तेल, ७-८ कढीपत्त्याची पानं, थोडी मोहरी, पाव टीस्पून हिंग कृती – १) एका कढईत थोडंसं तेल गरम करा. तेल गरम झालं की त्यात कांदा, लसूण आणि मिरची घाला. मध्यम आचेवर चांगलं परता. २) कांदा लालसर व्हायला लागला की त्यात तुरीचे दाणे घाला. नीट हलवा आणि झाकण घालून मंद आचेवर ठेवा. मधूनमधून हलवत रहा. ३) तुरीचे दाणे शिजत आले की ओलं खोबरं घाला आणि परता. ४) दोन मिनिटं परतून त्यात कोथिंबीर घाला. अजून दोन मिनिटं परता आणि गॅस बंद करा. ५) परतलेलं मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या. ६) मिश्रण थोडं जाडंभरडं (आमच्याकडे अर्धंबोबडं म्हणतात!) वाटा. आवडत नसेलच तर बारीक पेस्ट करा. वाटताना पाण्याचा वापर करा. ७) वाटलेलं मिश्रण एका पातेल्यात काढा. आपल्याला आमटी जितपत पातळ हवी असेल त्या प्रमाणात पाणी घाला. ८) पातेलं गॅसवर ठेवून आमटी उकळत ठेवा. त्यात मीठ, दाण्याचं कूट आणि काळा मसाला घाला. ९) एका लहान कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी घालून तडतडू द्या. मोहरी तडतडली की त्यात कढीपत्ता घाला, लगेचच हळद, तिखट आणि हिंग घाला आणि गॅस बंद करा. फोडणी खमंग झाली पाहिजे पण जळता कामा नये. १०) ही फोडणी वरून आमटीवर ओता. हलवून आमटी पाच मिनिटं उकळा. गॅस बंद करा. तुरीच्या दाण्यांची आमटी तयार आहे. ही आमटी गरम भाकरी, लोणी, ठेचा, मेथीची परतलेली भाजी यांच्याबरोबर फर्मास लागते. किंवा गरम भाताबरोबर तूप घालूनही उत्तम लागते. तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करा. लसणाचं प्रमाण आवडत असेल तर वाढवा. इतक्या साहित्यात मध्यम पातळ अशी ६ वाट्या आमटी होते. याच पध्दतीनं सोलाण्यांची किंवा भेंडीच्या दाण्यांचीही आमटी करता येते.

Comments

Popular posts from this blog

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी? लसूण चे फायदे

लसूण रात्री झोपताना उशाखाली का ठेवावी*? लसणाची फोडणी जेवणात स्वाद आणते. एक चमचा लसणाची पेस्ट जेवण लज्जतदार बनवते. त्यामुळे जवळपास भारतात सगळ्याच अन्नपदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. लसूण अन्नाचा स्वाद वाढवते. पण याव्यतिरिक्तही लसणाचे अनेक उपयोग आहे. आयुर्वेदात देखील लसणीचे महत्व सांगितले आहे. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. कर्करोगाचा धोका टाळण्याचे गुणही लसणीत आहेत. रोगप्रतिकाराक शक्ती असते. पूर्वी लसणाचा कांदा घराच्या कोपऱ्या ठेवला जायचा.  कारण हवेतील रोगजंतू नाहीसे व्हायचे. लसूण उशीखाली घेऊन झोपल्यामुळे चांगली झोप लागते. लसूण ही नकारात्मक उर्जा खेचून घेते आणि सकारात्मक उर्जा देते त्यामुळे आजही अनेक लोक लसणीची किमान एक पाकळी तरी आपल्या उशाखाली घेऊन झोपतात.लसूण हा उष्ण व तीष्ण गुणात्मक असल्याने वात व कफनाशक आहे. पोटात गॅस तयार होण्यापासून लसूण प्रतिबंध करते. हृदयासाठीही उपयुक्त असून शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून उपकारक कोलेस्टेरॉल वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते.  लसणीमधील पोटॅशियम शरीरातील पाण्यावर नियंत्रण ठेवते व त्या योगे उच्च ...

वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम

 *वेळेवर जेवण न केल्याचे दुष्परिणाम*  खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे. ♦ *हे आहेत दुष्परिणाम* ♦ ✅ 1. *वजन वाढते*  वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते. यामु फॅट्स शरीरात जमा होतात. यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. ✅ *2. चक्कर येणे*   भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते. ✅ *3. तणाव *  भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो. 22 ✅ *4. अन्य आजार *  वजन घटवायचे असल्यास पौष्टिक खा आणि काही वेळाच्या समप्रमाणात अंतराने खात राहा. अन्यथा विविध आजार शरीरात शिरकाव करू शकतात. ✅ *5. लठ्ठपणावर नियंत्रण *  योग्य आहार आणि व्यायाम वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि व्यायाम करा. ✅ *6.मेंदूचे कार्य*  ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प...

दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते?पंचकर्म म्हणजे काय?

 योग्य आहार-विहार व व्यायाम असेल तर शरीरात दोष साठत नाही. पंचकर्माच्या मदतीने शरीरात साठलेली विषद्रव्ये, वाढलेले दोष, अनावश्‍यक किंवा मलरूप झालेले धातू काढून टाकता येतात हे खरे असले तरी मुळात असे का होते हे समजून घ्यायला हवे. आयुर्वेदिक विषयी माहिती-  किडनी स्टोन झाला असल्यास हे पदार्थ खाऊ नये हे पण वाचा  हिवाळ्यामध्ये लसुण का खावा? दोष शरीरात साठतात म्हणजे नेमके काय होते? वात-पित्त-कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्त्वे असतात, शरीराची इमारत यांच्यावर उभी राहिलेली असते. शरीरात काम करण्यासाठी ज्यावेळी जो दोष आवश्‍यक असतो, त्यावेळी तो अधिक कार्यक्षम होणे, प्रमाणाने वाढणे हे आपोआप घडत असते. उदा. रात्री झोप येण्यासाठी शरीरातील कफदोष वाढावा लागतो, दुपारी जेवणानंतर पचन व्यवस्थित व्हावे यासाठी पित्ताचा प्रभाव वाढणे आवश्‍यक असते, सकाळी मल-मूत्र विसर्जन व्यवस्थित होण्यासाठी वातदोष वाढत असतो. वात-पित्त-कफाचे असे हे चक्र अविरतपणे चालू असते. शरीरातील सर्व tकार्ये व्यवस्थित चालू राहावीत हा यामागचा मूळ उद्देश असतो.  खाना खाने का सही तरिका - विडिओ देखे मात्र हा निसर्गक्रम ल...