Skip to main content

Posts

Showing posts from 2020

कठोर परिश्रम केल्याने दारिद्र्य येत नाही, आणखी वाचा -

कठोर परिश्रम केल्याने दारिद्र्य येत नाही  चाणक्याच्या या 6 गोष्टी वाचल्यास, शिकाल जग जिंकण्याची कला*  1 कठोर परिश्रम केल्याने दारिद्र्य येत नाही, धर्म केल्याने पाप राहत नाही, मौन बाळगण्याने मतभेद होत नाही आणि जागतं राहण्याने भीती राहत नाही.   2 जग हे कडू झाडासारखे आहे, याचे दोनच फळे गोड असतात - एक गोड बोलणं आणि दुसरं सज्जनांचे सहवास असणं. ➖️➖️ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ ➖️➖️ Buy on Amazon    Electric Blanket - Single Bed Size (150cms x 80cms) - Made in India - 05SBExpressions Electric Bed Warmer ➖️➖️ ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ ➖️➖️➖️ 3 ब्राह्मणांचे सामर्थ्य आहे ज्ञान, राजांचे सामर्थ्य   -  त्यांचे सैन्य आहे, वैश्यांचे सामर्थ्य त्यांची संपत्ती आहे आणि शूद्रांचे सामर्थ्य इतरांची सेवा करणे आहे. ब्राह्मणांचे कर्तव्य ज्ञानार्जन घेणे आहे. राजाचे कर्तव्य आपल्या सैन्याचे बळ वाढवणे आहे. वैश्यांचे कर्तव्य आपल्या व्यापाराला वाढवणे आहे, आणि शूद्रांचे कर्तव्य श्रेष्ठ लोकांची सेवा करणे आहे. buy in Amazon    ज्या व्यक्ती...

एखादी व्यक्ती शौचाची भावना रोखून धरते तेव्हा....

  बध्दकोष्ठ होण्यामागची कारणं जेवणात तंतुमय पदार्थांचा अभाव. व्यायामाचा अभाव- सर्व भौतिक सुख सोयींमुळे सध्या शारीरिक हालचाली फारच कमी प्रमाणात होतात. त्यामुळे त्याला रोज नियमित व्यायामाची जोड देणं आवश्यक आहे. शरीरास व्यायाम नसल्याने पोटातील पचलेलं/न पचलेलं अन्न पुढे सरकायला खूपच वेळ लागतो व बध्दकोष्ठ संभवतो. ताण तणाव- सध्याच्या सुपरफास्ट लाइफस्टाइलमुळे निर्माण होणाऱ्या ताणामुळे शरीरात संप्रेरकं (harmones) स्रवली जातात, ज्यांचा परिणाम आतड्यांच्या कार्यावर होऊन त्या मंदावतात. त्यामुळे पोटात गच्च वाटणं, ढेकर येणं, पोटात गॅसमुळे गुरगुर आवाज येणं, इ. तक्रारी सुरु होतात. गरोदरपण- यामध्ये पोटातील जागा ही वाढत्या बाळाने व गर्भाशयाने व्यापली गेलेली असल्याने आतड्याच्या कामात थोडा अडथळा उत्पन्न होतो व वरील सर्व गोष्टींमुळे बध्दकोष्ठाचा त्रास सुरु होतो. शौचाचा वेग रोखणं- केव्हा-केव्हा काही अपरिहार्य कारणांमुळे एखादी व्यक्ती शौचाची भावना रोखून धरते तेव्हा त्यामुळे निर्माण झालेला संडास कडक होऊन बध्दकोष्ठता होऊ शकते. गुदद्वाराच्या जागी असलेले मोड किंवा फिशर्स किंवा पाइल्स- यामुळे शौच करताना दुखतं...

या कारणामुळे तुमच्या दातांना कीड लागायला सुरुवात होते.त्यावर कोणते आयुर्वेदिक उपचार करायला हवे.

 तुम्हाला सतत दातदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला दात दुखीची कारणे देखील माहीत हवी. म्हणून दात दुखींच्या कारणांपासून सुरुवात करुया.  म्हणजे तुम्हाला तुमच्या दात दुखीचे कारण कळायला मदत होईल.     दात किडणे  दातांना लागलेली कीड  तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे कण जर दातांमध्ये तसेच राहिले तर ते अन्न तिथेच कुजते.त्यामुळे तुमच्या दातांना कीड लागायला सुरुवात होते. दातांना कीड लागण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर तुमच्या दातांना ती आतपर्यंत कोरत जाते. तुमचे दात सुरुवातीला खड्डे पडल्यासारखे वाटू लागतात. पण त्यानंतर त्यावर एक काळा थर साचत राहतो. म्हणूनच लहान मुलांचे दात किडल्यानंतर त्यांना तू चॉकलेट खातोस का? असे मुद्दाम विचारले जाते. मुळात दातांची कीड खोलपर्यंत गेल्यानंतर त्याचा रंग चॉकलेटी आणि मग काळा होऊ लागतो. कीड लागल्यानंतर तुमच्या दिसण्यातच नाही तर तुम्हाला दात दुखीचा त्रास देखील सुरु होतो.  वाचा - आयुर्वेदानुसार आपले जेवण कसे असावे.  नाजूक दात  आईस्क्रिम खाल्ल्यामुळे दातांना बसणाऱ्या झिणझिण्या अनेकदा दात चांगले असूनही ते गरम किंवा थंड खाल्ल्यामुळे द...

सर्व उपाय करून तुम्ही थकले असाल पण वजन मात्र वाढलं नसेल, तर हे आयुर्वेदिक उपाय करून बघा.

  बदलती जीवनशैली, स्पर्धा आणि करिअर यामध्ये टिकायचं असेल तर प्रभावी व्यक्तिमत्त्व असणे गरजेचं आहे. शरीरयष्टी सुदृढ असेल तर तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकता. यासाठी तुम्हाला फिट राहणंही आवश्यक आहे. वाढत्या वजनाच्या समस्येनुसार कित्येक जण वजन वाढत नसल्यानंही हैराण झालेले असतात. वजन न वाढणे देखील तरुणांमधील चिंतेचा विषय आहे. वजन वाढवण्यासाठी तुम्ही घरगुती, औषधी, आयुर्वेदिक सर्व उपाय करून तुम्ही थकले असाल पण वजन मात्र वाढलं नसेल. निराश होऊ नका. वजन वाढीसाठी मनापासून प्रयत्न केले तर नक्की यश मिळेल. यासाठी बाजारातील प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेक ही तुम्ही घेऊ शकता  त्यासाठी अश्वगंधा युक्त असलेले प्रोटीन पावडरच वापरा कारण ते आयुर्वेदिक असल्यामुळे एकदा वजन वाढले की नंतर कमी होत नाही. अश्वगंधा पावडर तुमची चरबी न वाढवता आतील मासपेशी आणी हाड यांची वाढ करते . तुमच्या खिशाला परवडतील असे प्रोटीन पावडर वापरा आणि वजन वाढवा.हिवाळ्यातल्या दिवसांची संधी साधून आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. हिवाळा म्हणजे वजन वाढवण्याचीही उत्तम संधी. फक्त त्यासाठी काही आहारीय घटकांचा, फळांचा ...

संतुलित पोषक आहार म्हणजे काय आहे? मनपसंत पदार्थ समोर आल्यावर भूक नसते पण इच्छा होते ती कृत्रिम भूक)

 बदलत्या जीवनशैलीत आपण नैसर्गिक वागणे विसरून कृत्रिमपणे वागत राहतो. तसे न करता सहज आणि नैसर्गिकपणे वागा. आपली शरीर यंत्रणा नैसर्गिक आहे. त्यामुळे आपले शरीर जेव्हा काही सूचना, इशारे देते तेव्हा त्यांचे पालन करा. झोप आली तर लगेच झोपा. कारण झोप ही शरीराची प्राकृतिक क्रिया आहे. झोपेमुळे शरीराला विश्रांती मिळते. रात्री वेळेत न झोपल्यास किंवा जागरण झाल्यास दुसरा दिवस आळसात जातो. कामाच्या ठिकाणी अवेळी डुलक्या येऊ लागतात, कामावर परिणाम होऊन कामात चुका होतात. झोप पूर्ण होऊन जाग आली असेल तर अंथरुणावर उगाचच लोळत राहू नका. शौच किंवा लघवीचा वेग अडवून धरू नका. त्याचे त्वरित विसर्जन करून टाका. मलविसर्जन योग्य प्रकारे झाले नाही तर बेचैनी वाढून गॅसही वाढतो. पोट ताठरल्यासारखे होऊन बेचैनी वाढते. हे पण वाचा - आयुर्वेदानुसार आपले जेवण कसे असावे घराबाहेर जायचे आहे आणि बाहेर गेल्यावर गडबड नको म्हणून शौच-लघवीचा वेग आला नसतानाही आपण कुंथून मल-मूत्र विसर्जनाचा प्रयत्न करतो. अशा वेळी जोर-जबरदस्तीने मल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गुदद्वाराच्या त्वचेला जखम होऊ शकते. वारंवार शौचास होत असल्यास त्याची कारणे शोधा....